Breaking News
  • पुणे महापालिकेच्या एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा लोकार्पण
  • ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये झाड कोसळून ११ वाहनांचे नुकसान तर एक जण किरकोळ जखमी
  • जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई
  • पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ भागातील कारखान्यावर छापा
  • राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा मेळावा
  • उद्धव ठाकरे यांना मोठा झटका! आमदार सचिन अहिर यांचा शिंदेसेनेत प्रवेश
  • अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या कंधार मध्ये सत्याग्रह आंदोलन
  • नवी मुंबईतील वाशी भाजी मार्केट पावसामुळे कोसळलं
  • कल्याण कोळसेवाडीत जिममधील डंबेलच्या वादातून हल्ला लहान भावानंतर मोठ्या भावालाही बेदम मारहाण

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Stray Cattle

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत, नागरिक हैराण

रविवारी (२९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी चौकात मोकाट जनावरांनी अक्षरशः अड्डा जमवल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.


हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात वाहतूक विस्कळीत नागरिक हैराण

Stray Cattle |

हिंगोली (Stray Cattle) : हिंगोली शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये मोकाट जनावरांचे कळप ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी (२९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी चौकात मोकाट जनावरांनी अक्षरशः अड्डा जमवल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

महात्मा गांधी चौक हा हिंगोली शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानला जातो. शासकीय कार्यालये, बँका, बाजारपेठ तसेच शाळा-महाविद्यालयांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र, सकाळपासूनच मोठ्या संख्येने गायी आणि बैल चौकात जमल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

मोकाट जनावरांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले. काही काळ चौकात वाहतूक कोंडीही निर्माण झाली. दरम्यान, काही जनावरे अचानक उधळल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला.

शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न नवीन नसून त्यावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरे पकडण्याचा प्रयत्न केला असला, तरी काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सध्या हिंगोली नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसून प्रभारी कारभार सुरू आहे. प्रशासनातील या अस्थिरतेचा परिणाम शहराच्या दैनंदिन व्यवस्थेवर होत असल्याची चर्चा आहे. मुख्याधिकारी नसल्याने मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी ठोस नियोजन होत नसून कारवाईत सातत्य राहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

महात्मा गांधी चौकातील रविवारी घडलेल्या प्रकारानंतर नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिकेने तातडीने विशेष पथक नेमून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, तसेच संबंधित जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related to this topic: