Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Social Service

हिंगोलीच्या आडगाव फाट्यावर वारकरी भक्तांसाठी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर

पंढरपूरच्या पायी वारीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव फाटा येथे यंदाही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


हिंगोलीच्या आडगाव फाट्यावर वारकरी भक्तांसाठी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर

Social Service |

हिंगोली : पंढरपूरच्या पायी वारीला निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंगोली जिल्ह्यातील आडगाव फाटा येथे यंदाही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी आडगाव फाटा, ता. जि. हिंगोली येथे फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. वारीच्या मार्गावर थकलेल्या वारकऱ्यांना विश्रांती, अल्पोपहार आणि आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सारिकाताई चांदणे महिला मंडळ आणि मुनीर पठाण सर मित्र मंडळ, आडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी सर्व वारकऱ्यांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना मुनीर पठाण म्हणाले, "वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून माणुसकीची आणि सेवेची शिकवण देणारी आहे. त्याच भावनेतून दरवर्षी या ठिकाणी फराळ वाटप आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते."

या आरोग्य शिबिरात डॉक्टरांच्या पथकामार्फत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहेत. उन्हाच्या कडाक्यात पायी प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच सर्व वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटपही करण्यात येणार आहे.

आयोजकांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुनीर पठाण यांच्या पुढाकाराने आडगाव परिसरात हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी लीन होऊन पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना या सेवेतून निश्चितच ऊर्जा आणि दिलासा मिळेल, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला.

Related to this topic: