Sambhaji Brigade Protest: संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलन
शेतकरी समस्या, पेपरफुटी, लोडशेडिंगसह अनेक मागण्यांसाठी आंदोलन
वसमत (Sambhaji Brigade Protest) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या विद्यार्थ्यावर झालेला लाठी हल्ला यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कवठा टी पॉईंट येथे झालेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी ठप्प झाली होती मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी दिला.
वसमतवळील कवठा टी-पॉईंट येथे 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेडच्यावतीने 'रस्ता रोको आंदोलन' करण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या लोडशेडिंग,नीटपेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला, पिक विमा यांसह शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शासनाकडे हळद पीक विमा तात्काळ मंजूर करावा ,पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला (Sambhaji Brigade Protest) करणाऱ्यांवर कारवाई करावी, ग्रामीण भागातील अघोषित लोडशेडिंग बंद करावी.या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध मागण्या मांडण्यात आल्या शासनाच्या धोरणाचा यावेळी उपस्थित पदाधिकारी नेत्यांनी निषेध नोंदवला या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, तानाजी भोसले यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते रस्ता रोको मुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.