Breaking News
  • भीमाशंकरमध्ये विनापास दर्शनाला प्रतिसाद; वाढत्या गर्दीमुळे अनेक भाविक दर्शनाविना परतण्याची वेळ
  • दोडामार्ग विर्डी धबधब्याच्या खोल जलकुंडात पर्यटक बुडाला
  • घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप
  • खाजगी ट्रॅव्हल्स मधील वाहकाची मुजोरी, ट्रॅव्हल्स मधील महिला प्रवासी महिलेला उद्धट बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न
  • अखेर मुंबईत पावसाचं आगमन झालेलं आहे. चर्चगेटमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
  • मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Pune Sangamner Nashik Railway

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे प्रकल्पाला अखेर ब्रेक? रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाने उत्तर महाराष्ट्रात संताप

तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेल्या पुणे-संगमनेर-नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाबाबत निराशाजनक माहिती समोर आली आहे.


पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे प्रकल्पाला अखेर ब्रेक रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाने उत्तर महाराष्ट्रात संताप

Pune Sangamner Nashik Railway |

GMRT प्रकल्पामुळे सरळ रेल्वेमार्ग रद्द झाल्याची माहिती; उद्योग, शेती आणि प्रवाशांच्या विकासाच्या अपेक्षांना मोठा धक्का

नाशिक (Pune Sangamner Nashik Railway) : तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेल्या पुणे-संगमनेर-नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाबाबत निराशाजनक माहिती समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा रेल्वे मार्ग रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव आणि खेड परिसराच्या विकासाच्या अपेक्षांना मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीएमआरटी (Giant Metrewave Radio Telescope - GMRT) प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आधार घेत रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित सरळ रेल्वेमार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प विविध निवडणुकांतील जाहीरनाम्यांमध्ये, राजकीय आश्वासनांमध्ये आणि सार्वजनिक व्यासपीठांवर सातत्याने चर्चेत राहिला होता. मात्र, आता हा प्रकल्प पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे राज्यातील दोन महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी सिन्नर आणि चाकण यांना थेट रेल्वे जोडणी मिळणार होती. या जोडणीमुळे उद्योग क्षेत्रातील मालवाहतुकीचा खर्च कमी झाला असता आणि औद्योगिक विकासाला नवी चालना मिळाली असती. त्याचबरोबर हजारो रोजगारनिर्मितीला संधी मिळाली असती. विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुणे आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होण्याची अपेक्षा होती.

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होणार असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या लासलगाव येथून मुंबईकडे रेल्वेमार्गाने कांद्याची वाहतूक करण्यासाठी प्रति टन सुमारे २५० रुपये खर्च येतो. मात्र, सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर आणि आंबेगाव परिसरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना त्याच मालाच्या वाहतुकीसाठी प्रति टन २,५०० ते ३,००० रुपये खर्च करावे लागतात. प्रस्तावित रेल्वेमार्ग अस्तित्वात आला असता, तर वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असता, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दरम्यान, या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकास प्रकल्पांचा विचार करताना केवळ आर्थिक नफा-तोटा हा निकष न ठेवता जनहित आणि भावी पिढ्यांचा विकास यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिक-सिन्नर-संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द केल्यामुळे नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फटका बसणार असल्याचा दावा त्यांनी केला.

यासोबतच सत्यजीत तांबे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका करत या निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात हस्तक्षेप करून प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील विकासाच्या अनेक योजना पुन्हा अनिश्चिततेत गेल्याची भावना व्यक्त होत असून, उद्योग, शेती, रोजगार आणि वाहतूक व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: