Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Political Crisis

खासदारांनी खाजगी निधीसाठी पक्षांतर केले; जनताच त्यांना धडा शिकवेल – उद्धव ठाकरे

राज्यातील खासदारांनी विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे पक्षांतर केलेले नाही. मिळालेला निधीही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे.


खासदारांनी खाजगी निधीसाठी पक्षांतर केले जनताच त्यांना धडा शिकवेल – उद्धव ठाकरे

Political Crisis |

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची कबुली; परभणीत पत्रकार परिषद

परभणी (Political Crisis) : राज्यातील खासदारांनी विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे पक्षांतर केलेले नाही. मिळालेला निधीही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. जनतेची कामे न करणाऱ्या खासदारांनी खाजगी स्वार्थासाठी गद्दारी करत पक्षांतर केले, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

राज्यातील 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी या विषयावर भाष्य केले.

यावेळी ठाकरे म्हणाले, "प्रत्येक खासदाराचा हजेरीपट आमच्याकडे आहे. मतदारसंघाच्या कामांसाठी त्यांनी मंत्र्यांची किती वेळा भेट घेतली आणि स्वतःच्या कामांसाठी किती वेळा गेले, याचा संपूर्ण आढावा आमच्याकडे आहे. गद्दारीच्या मुळावर घाव घालण्याचे काम यापुढे केले जाईल. गद्दारी करणाऱ्या खासदारांना मतदारच योग्य वेळी धडा शिकवतील."

राज्यात अस्थिरता वाढली असून पेपरफुटीच्या घटना महाराष्ट्रातच घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. सध्याचे सरकार कर्जमाफीची भाषा करते. माफी गुन्हेगाराला दिली जाते, तर आम्ही शेतकऱ्यांच्या ऋणात आहोत. शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले निर्णय घेण्यापूर्वीच आमचे सरकार पाडण्यात आले आणि आज महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

महायुती सरकार राज्यात केवळ जातीयवाद वाढवून सत्ता टिकवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडीत एकमत नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर आघाडीत पूर्ण एकमत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर काही ठिकाणी एकवाक्यता नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. या विषयावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परभणीच्या खासदारांना जनताच उत्तर देईल. तसेच परभणीकरांनी महापौर दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आणखी एका खासदाराने गद्दारी केल्याबद्दल क्षमा मागण्यासाठी आपण परभणीत आलो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर सय्यद इकबाल यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Related to this topic: