जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 39 पोलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांची पोलीस दलासह जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
हिंगोली (Police Transfers) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 39 पोलीस अंमलदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांची पोलीस दलासह जिल्हाभरात जोरदार चर्चा रंगली आहे.
आदेशानुसार हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील शेख मुजीबुर रहमान यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, अझरअलमाखां शफीउल्लाखां पठाण यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, संतोष देवराव करे यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, रमेश संभाजी कोरडे यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, रवि नारायण इंगोले यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, प्रदीप प्रकाश राठोड यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, राहुल विश्वनाथअण्णा गोटे यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, गोविंद सुभाषराव खोडकर यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, ओमनाथ भिकुलाल राठोड यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, शिवाजी शेषराव पवार यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, माधव किशनराव सूर्यवंशी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, शेख एकबाल सिकंदर यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, गजानन भिकाजी गिरी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे, गजानन टोपाजी भालेराव यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे, सय्यद इम्रान स. अशरफ कादरी यांची पोलीस मुख्यालय, हिंगोली येथे तसेच सुमित विनायकराव टाले यांची मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे.
याशिवाय हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, गोरगाव, नर्सी नामदेव, बासंबा, कुरुंदा, बाळापूर, हत्ता, वसमत शहर, वसमत ग्रामीण आणि एटीव्ही येथील अन्य अंमलदारांचीही पोलीस मुख्यालय, हिंगोली व मोटार परिवहन विभाग, हिंगोली येथे पुढील आदेशापर्यंत तैनाती करण्यात आली आहे.
सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना 29 मे रोजी रात्री 8 वाजेपर्यंत कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलात आणि जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी डिसेंबर 2025 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सखोल अभ्यास करून या बदल्या केल्याची चर्चा आहे. विशेषतः बहुतांश पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील अर्थकारणाशी निगडित कर्मचाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश असल्याने पोलीस दलात अमूलाग्र बदल घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.