Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी-जिंतूर महामार्ग

परभणीत बोगदे सज्ज तरीही घ्यावा लागतो एक किमीचा वळसा

Parbhani-Jintur Highway: परभणीत जिंतूरसाठी उड्डाणपुल व डब्बा बोगद्याचे काम सुरू आहे, परंतु सध्यातील स्थितीमुळे वाहन धारकांना एक किलोमीटरचा वळसा घालावा लागतो.


परभणीत बोगदे सज्ज तरीही घ्यावा लागतो एक किमीचा वळसा

Parbhani-Jintur Highway |

 

परभणी-जिंतूर महामार्गावर वाहनधारकांची अडचण; कंत्राटदार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

परभणी (Parbhani-Jintur Highway) : जिंतूर या रोडवर बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याला ओलांडण्याकरीता उड्डाणपुल बांधला जात आहे. उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी सज्ज आहेत. सद्यस्थितीत हे बोगदे बंद असल्याने वाहन धारकांना एक किलोमिटरचा वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहेत.

परभणी शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरासाठी बायपास रस्ता बनविण्यात आला आहे. पाथरी रोड ते जिंतूर रोड या मार्गे सदर बायपास वसमत रोडवर जुळणार आहे. परभणी - जिंतूर हा मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपुल बनविण्यात आला आहे. वाहतुकीला अडचण होऊ नये यासाठी उड्डाणपुलाखाली बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. परभणीतून जिंतूरकडे जाताना वाहनधारकांना एक किमीचा वळसा मारावा लागत होता. सध्या हे बोगदे तयार आहेत, मात्र वाहतुकीला खुले न करण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. उड्डाणपुलाखालील बोगदे वाहतुकीसाठी खुले केल्यास इंधनासह मोठ्या प्रमाणात वेळेचीही बचत होईल. 

इंधन, वेळेचा अपव्यय
या रस्त्यावरुन जाताना दररोज हजारो वाहनांना एक किमीचा वळसा मारुन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे हजारो लिटर इंधनासह वेळेचाही अपव्यय होत आहे. याकडे प्रशासन, कंत्राटदार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचे लक्ष गेलेले नाही. रस्त्यावरुन ये - जा करणारे वाहनधारकही गुपचुप वळसा मारुन रस्ता ओलांडत आहेत.