Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विधान परिषद निवडणूक

विधान परिषद निवडणूक: उमेदवारीसाठी होणार मोठी रस्सीखेच

Legislative Council Elections: परभणी हिंगोली मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय लढा मोठ्या प्रमाणात आहे.


विधान परिषद निवडणूक उमेदवारीसाठी होणार मोठी रस्सीखेच

Legislative Council Elections |

 

हिंगोली - परभणी विधान परीषद पक्षीय बलाबल

हिंगोली (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होताच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारीसाठी पक्ष पातळीवर मोठी रस्सीखेच होईल असा अंदाज आहे. 
   
मोठ्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांना संधी मिळाली होती. काँग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत झाले खरे पण त्यांनी मते चांगली मिळविली होती. यंदाच्या निवडणुकीत सरळ सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास युतीच्या विजयाचा मार्ग मोकळा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्याने यावेळी केवळ ४६८ मतदार आहेत. त्यात युतीकडे ३०७ मतदार असून आघाडीकडे केवळ ११९ मतदार आहेत.

या जागेसाठी मोठी चुरस महायुती अंतर्गत पहावयास मिळणार आहे. ही जागा पूर्वीच्या युतीमध्ये शिवसेनेकडे होती. त्यानुसार पुन्हा शिवसेनेलाच संधी मिळावी अशी शिंदेंच्या शिवसेनेची मागणी असेल. मागील वेळी युतीमध्ये दावा सोडणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची संख्या यंदा शिवसेनेपेक्षा अधिक आहे. शिवसेनेकडे ७७ मतदार असून भारतीय जनता पक्षाकडे ९९ मतदार आहेत. मतदार संख्येनुसार युतीमध्ये शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर आहे व भारतीय जनता पक्ष दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे मतदार संख्येचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे १३१ मतदार आहेत. यामुळे शिवसेनेला युतीमध्ये जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
   
एकंदरीत मतदार संख्येचा विचार केला असता एकूण ४६५ पैकी ३३५ मतदार परभणी जिल्ह्यात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा दावा तसा कमकुवत आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण १३० मतदार आहेत हिंगोलीतून शिवसेनेत उमेदवारी मागण्या मागणार्‍यांची यादी मोठी आहे. पक्ष पातळीवर होणार्‍या वाटाघाटीत ही जागा जर भारतीय जनता पक्षाला मिळाली तर उमेदवार परभणी जिल्ह्यातून येण्याची चिन्हे आहेत, कारण भारतीय जनता पक्षाने हिंगोली जिल्ह्याला एक अतिरिक्त राज्यसभेचा खासदार व एक विधान परिषदेचा आमदार दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक सदस्य संख्या असली तरी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षा फार वाढलेली आहे.

नैसर्गिक नियम डावलून शिवसेनेकडून ही जागा कोणाला द्यायची असेल तर अपक्षांसहित इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन सदस्य संख्या वाढविण्याची कसब भारतीय जनता पक्षाकडेच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे ४६८ पैकी केवळ १०२ मतदार असल्याने फारसे इच्छुक आघाडीकडे आज तरी दिसत नाहीत. आघाडीच्या उमेदवाराला जिंकण्या साठी आघाडीची सगळी मते घेऊन अपक्ष व इतर पक्षांना तर घ्यावेच लागेल शिवाय महायुतीचे मतदारही फोडावे लागतील. एकंदरीत हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी सत्ताधारी पक्षांतच मोठी रस्सीखेच पहावयास मिळणार आहे हे निश्चित.

अपक्ष उमेदवार वाढवू शकते चुरस

विधान परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची तर शक्यता आहेच किंबहुना एखादा उमेदवार मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक मजबूत मैदानात उतरू शकतो. महायुती व महाविकास आघाडी कडून प्रत्येकी एक उमेदवार येईल हे तर नक्कीच आहे. दोन्ही बाजूने तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार्‍यांमुळे ही निवडणूक चुरशीची होईल. उमेदवारांची संख्या वाढल्यास फार कमी मतदार सोबत घेऊन विजय मिळविणे सोपे असल्याने यावेळी मतदारांची मोठी चांदी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

Related to this topic: