Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नॅशनल हायवे मृत्यू

खानापूर चिता येथे वन्यजीवांसाठी नॅशनल हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा

National Highway Death Trap:


खानापूर चिता येथे वन्यजीवांसाठी नॅशनल हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा

National Highway Death Trap |

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू

खानापूर चिता (National Highway Death Trap) : हिंगोली ते नांदेड जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ खानापूर चिता परिसरात वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्ता ओलांडणाऱ्या वन्य प्राण्यांचे अपघाताने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल याच महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वानराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्राणी मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पैलवान सोपान जाधव पाटील, बाळासाहेब पवार, गोपाल पवार आणि रामप्रसाद जाधव यांच्या सहकार्याने मृत वानरावर विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. 

स्थानिक प्राणी मित्रांनी वारंवार सूचना देऊनही वनविभागाने या (National Highway Death Trap) महामार्गावर अद्याप वन्यजीव क्रॉसिंगचे फलक लावलेले नाहीत. फलक नसल्याने आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने आतापर्यंत शेकडो वन्यजीवांचा बळी गेला आहे. 

या परिस्थितीमुळे वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागाने तातडीने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वन्यजीव सूचना फलक व वेगमर्यादा फलक लावावेत, अशी मागणी संस्थेचे रामप्रसाद जाधव आणि ओम जाधव यांनी केली आहे. फलक न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. या (National Highway Death Trap) मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी देखील वन्यजीवांचा विचार करून संथ गतीने वाहने चालवावीत, असे आवाहन प्राणी मित्रांनी केले आहे.