Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप बंद; विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती

Zilla Parishad School: खेड्रीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दोन हातपंप सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याच्या अडचणीने सामना करावयाची आहे. येथील युवक संघाचे नेते दुरुस्तीसाठी


जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप बंद विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती

Zilla Parishad School |

खेट्रीतील प्रकार; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पातूर (Zilla Parishad School) : पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात युवा सेना (उबाठा शिवसेना) सस्ती सर्कल प्रमुख सय्यद समीर यांनी ३० जून रोजी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज असताना दोन्ही हातपंप बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.

हातपंपांची त्वरित दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थी व पालकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सय्यद समीर यांनी दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप सुमारे सहा महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शाळेसारख्या मूलभूत सुविधांच्या ठिकाणीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

"खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बसविण्यात आलेले दोन्ही हातपंप गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास विद्यार्थी व पालकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल."
-सय्यद समीर, युवा सेना सस्ती सर्कल प्रमुख (उबाठा शिवसेना)

Related to this topic: