Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

धानोरा-वाईगोळ रस्ता

धानोरा-वाईगोळ रस्ता कामात अनियमितता; अतिक्रमणबाबत चौकशी करण्याची मागणी!

Dhanora-Waigol Road: धानोरा-वाईगोळ रस्त्याच्या कामात अतिक्रमणबाबत निलेश प्रकाश राठोड यांनी तकरार केली. जिल्हाधिकारीने चौकशी व करवाईसाठी मागणी करावी असे म्हटले आहे.


धानोरा-वाईगोळ रस्ता कामात अनियमितता अतिक्रमणबाबत चौकशी करण्याची मागणी   

Dhanora-Waigol Road |

मानोरा (Dhanora-Waigol Road) : तालुक्यातील धानोरा ते वाईगोळ या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अतिक्रमणाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप फुलउमरी येथील निलेश प्रकाश राठोड यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे मागणी जिल्हाधिकारी याजकडे तक्रारकर्त्याने केली आहे.  
   
धानोरा ते वाईगोळ या (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम सध्या सुरू असून या मार्गावर फुलउमरी हे गाव मानोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाला लागूनच हा मार्ग जात असल्याने रस्त्याच्या दर्जा व अतिक्रमणामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गावर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. ते हटवण्यासाठी संबंधित आय.सी.सी. इन्फ्राटेक कंपनीने फुलउमरी ग्रामपंचायतीस पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार काही लोकांनी अतिक्रमण हटविले आहे, परंतु काही लोक अजूनही अतिक्रमण हटविण्यास तयार नाहीत. इस्टिमेटनुसार २४ मीटर अतिक्रमण हटविण्याचे कामही टाळाटाळ करून रखडवण्यात येत आहे.

या बाबतीत कामावर पाहणी करणारे सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे की, सुपरवायझर, इंजिनिअर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी एकमेकांशी संगनमत करून काम सुरू ठेवले आहे. तसेच रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.  

कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याच्या कामात पारदर्शकता नसल्याने शासकीय निधीचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  आजपर्यंत गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहून जात होते. परंतु आता रस्त्याची उंची वाढविल्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात जाण्याची शक्यता वाढली आहे. (Dhanora-Waigol Road) रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा संपूर्ण मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने गावातील सांडपाणी घरामध्ये साचण्याची व लोकांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, रस्त्याचे काम दर्जेदार करावे आणि अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी याजकडे निलेश राठोड यांनी केली आहे.

Related to this topic: