CJP Abhijeet Deepke: हिंगोलीमध्ये संतुक पिंपरीला आलेल्या अभिजीत दिपकेच्या भाषणात दिसून येते की, टेलिग्राम सारखे माध्यम तरुणांना राजकारणासाठी एकत्र करतात आणि लोकशाही वादसंगतींमध्ये
हिंगोली (CJP Abhijeet Dipke) : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील मुळगावी १९ जून रोजी आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना डिजीटल चळवळीने अवघ्या काही दिवसातच देशभरात वादळ निर्माण झाले असल्याचे सांगितले.
संतुक पिंपरी येथे ‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके (CJP Abhijeet Dipke) हे आले असता त्यांनी सांगितले की, टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर तरुणांच्या आवाजासाठी करणे किती महत्त्वाचे आहे, यावर ठाम भूमिका मांडली आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या १५ मे २०२६ च्या ‘झुरळ’ वक्तव्यानंतर जन्माला आलेल्या या डिजिटल चळवळीने अवघ्या काही दिवसांतच देशभरात वादळ निर्माण केले. अभिजीत दिपके यांनी टेलिग्रामचा उल्लेख करत सांगितले की, मुख्य प्रवाहातील राजकारणातून डावलल्या गेलेल्या, बेरोजगार, ‘क्रॉनिकली ऑनलाइन’ तरुणांसाठी टेलिग्रामसारखी व्यासपीठे आता नव्या राजकीय चर्चेची आणि संघटनाची केंद्रे बनली आहेत.
त्यांच्या मते, व्यवस्थेवरील टीकेला ‘परजीवी’ ठरवण्याऐवजी टेलिग्रामसारख्या माध्यमातून लाखो तरुण एकत्र येत प्रश्न विचारत आहेत, हेच खरे लोकशाहीचे लक्षण आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आणि पुणे विद्यापीठातील निदर्शनांनंतर दिपके (CJP Abhijeet Dipke) यांनी स्पष्ट केले की, ‘कॉक्रोज जनता पार्टी’ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर पेपर लीक, बेरोजगारी आणि तरुणांच्या मानसिक तणावावर डिजिटल माध्यमातून राजकीय विमर्श घडवण्यासाठी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभरातील तरुण वर्गात चर्चेला नवे वळण मिळाले आहे.