Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

खेत बचाव अभियान

बोटेकसा येथे 'खेत बचाव अभियाना'अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न; आधुनिक शेती आणि पोक्रा योजनेवर भर

Farm Rescue Mission: बोटेकसा येथील 'खेत बचाव अभियान' मध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, जल संवर्धन व खरीपपूर्वी निवेशण्याच्या पद्धतींमध्ये मार्गदर्शन देण्यात आले.


बोटेकसा येथे खेत बचाव अभियानाअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा संपन्न आधुनिक शेती आणि पोक्रा योजनेवर भर

Farm Rescue Mission |

कोरची (Farm Rescue Mission) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानयुक्त आणि हवामान अनुकूल शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा बोटेकसा येथे "खेत बचाव अभियान" अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पारंपरिक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बदलत्या हवामानात सेंद्रिय शेतीची कास धरा: महेश परांजपे
या (Farm Rescue Mission) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा येथील उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाढता शेती खर्च आणि बदलत चाललेले हवामान यावर चिंता व्यक्त केली. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर वाढवावा, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपली शेती अधिक फायदेशीर कशी करावी, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चिरडे यांनी 'अल निनो' मुळे हवामानात होणाऱ्या बदलांची आणि त्याच्या शेतीवरील परिणामांची शेतकऱ्यांना जाणीव करून दिली. यावर प्रभावी उपाय म्हणून त्यांनी थेट भात पेरणी (DSR) तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली, ज्यामुळे पाण्याची आणि मजुरीची मोठी बचत होऊ शकते. तसेच, पिकांचे रोगांपासून रक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी पटवून दिले.

डॉ. लाकडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. यामध्ये शेततळे, शेततळे अस्तरीकरण आणि बोडी खोलीकरण यांसारख्या जल व मृद संधारणाच्या कामांद्वारे पाण्याचे स्त्रोत बळकट कसे करावेत, तसेच खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नियोजन कसे असावे, हे त्यांनी समजावून सांगितले.

कोरचीचे तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी पोक्रा योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, अर्ज करण्याची सोपी पद्धत आणि त्यातील पारदर्शकता यावर प्रकाश टाकला. तसेच, शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिकांबद्दल माहिती देऊन नवीन वाणांचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी केवळ तात्विक माहिती न देता, मंडळ कृषी अधिकारी डी. जे. मसराम यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष बीज प्रक्रिया  कशी करावी आणि पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी, याचे जिवंत प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोटेकसा आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना खरीप पूर्व नियोजनाची अत्यंत मोलाची माहिती मिळाली. DSR तंत्रज्ञान, पाण्याचे स्त्रोत बळकट करणाऱ्या योजना आणि प्रत्यक्ष बीज प्रक्रियेचे धडे मिळाल्यामुळे आगामी हंगामात उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकतेत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोक्राचे प्रकल्प सहाय्यक अमित केराम, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील जमकातन, प्रथमेश कराडे, पीएम किसानचे, अविनाश हुमणे आणि बोटेकसा येथील कृषिताई श्रीमती टिकुला भानारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.