Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शेतकरी अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

Farmers' Hunger Strike: 'अन्नत्याग' आंदोलनात शेतकर्यांना २०१९पासूनच उलटलेल्या करजमाफीचा लाभ व करजसुलतीच्या ५०,००० रु. मर्यादेचे बाधक काढण्यासाठी आवाज उठविण्यात येणार.


शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘अन्नत्याग’ आंदोलन अहमदपूरमध्ये

Farmers' Hunger Strike |

अहमदपूर (Farmers' Hunger Strike) : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने आज, दि. १३ जून रोजी अहमदपूर येथे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन (Farmers' Hunger Strike) आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात होणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पीकविमा आणि आर्थिक सवलतींसह विविध मागण्यांसाठी आवाज उठविण्यात येणार आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच एकरकमी समजोता (OTS) योजनेतील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, अशी भूमिका (Farmers' Hunger Strike) आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. याशिवाय दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम आधी भरण्याची अट रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियमित कर्जफेडीची अट शिथिल करणे, २०१७ मधील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देणे, तसेच पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून अल्प प्रीमियममध्ये योजना पुन्हा लागू करणे या प्रमुख मागण्या आंदोलनात मांडल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी आर्थिक मदत मिळावी यासाठी बंद पडलेल्या कर्जखात्यांचे पुनर्गठन करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. "कर्जवसुली नकोच, कर्जमाफी हवीच" अशी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे शेतकरी हिताचे निर्णय तातडीने घेण्याचे आवाहन केले आहे. या (Farmers' Hunger Strike) आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस केदारअप्पा काडवे, कार्याध्यक्ष राजकुमार रामराव बोडके आणि तालुकाध्यक्ष संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, या अपेक्षेने परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.