Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > पुणे

Lokmanya Tilak National Award

'एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले'; फडणवीसांची अमित शाहांवर टिप्पणी

पुण्यात गुरुवारी झालेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला.


एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले फडणवीसांची अमित शाहांवर टिप्पणी

Lokmanya Tilak National Award |

पुण्यात पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; भारताच्या सुरक्षा धोरणात अजित डोवाल यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक

पुण्यात गुरुवारी झालेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र मंडळ, स्वारगेट, महर्षी नगर येथील मैदानावर करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील योगदानाचा गौरव करत त्यांना 'राष्ट्रीय सुरक्षेचे चाणक्य' असे संबोधले.

कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण आयुष्य देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित करणाऱ्या व्यक्तीला हा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत, "एका धुरंधराचा गौरव करण्यासाठी दुसरे धुरंधर उपस्थित आहेत," अशा शब्दांत दोन्ही नेत्यांचा गौरव केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अजित डोवाल यांना सन्मानित करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील चाणक्य मानले जाणारे अमित शाह उपस्थित असल्याने हा विशेष योग असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आले. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील रणनीती आणि कूटनीती अधिक प्रभावी करण्यामध्ये डोवाल यांनी मोठी भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी असेही नमूद केले की, आजचा भारत केवळ हल्ले सहन करणारा देश राहिलेला नाही, तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आवश्यकतेनुसार शत्रूच्या भूमीत जाऊन प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेला देश बनला आहे. या बदलामागे भारताच्या सामरिक धोरणात आणि सुरक्षा व्यवस्थेत अजित डोवाल यांच्या योगदानाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी अजित डोवाल यांचे प्रसिद्ध विधानही उद्धृत केले. "There is no silver medal in national security. If you win, you make history. If you lose, you become history." या विचारातून राष्ट्रीय सुरक्षेबाबतची त्यांची स्पष्ट भूमिका दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.

देशाच्या सुरक्षेसाठी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि कधीही पुरस्कार किंवा सन्मानाची अपेक्षा न ठेवणाऱ्या व्यक्तीला आज हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Related to this topic: