Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात

Karanja Fire |

कारंजा घाडगे (Karanja Fire) : कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरण कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत अचानक आग भडकली. आगीची तीव्रता भीषण असून, महावितरणचे कर्मचारी आपल्या स्तरावर उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा; सोलर प्लांट धोक्यात
धक्कादायक बाब म्हणजे आग लागून बराच वेळ झाला तरीही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकला नाही. अग्निशमन दलाच्या या विलंबाचा फटका आता बसताना दिसत आहे. आग अधिकच पसरत चालली असून, महावितरण कार्यालयाच्या समोरच असलेल्या सोलर प्लांट (सौर ऊर्जा प्रकल्प) पर्यंत या आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.

सोलर प्लांटला आगीने वेढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन बंब तात्काळ न पोहोचल्याने स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Related to this topic: