Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग; अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात!

कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


कारंजा येथील महावितरण कार्यालयात भीषण आग अग्निशमन दल न पोहोचल्याने सोलर प्लांट धोक्यात

Karanja Fire |

कारंजा घाडगे (Karanja Fire) : कारंजा घाडगे येथील महावितरण कार्यालय परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महावितरण कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत अचानक आग भडकली. आगीची तीव्रता भीषण असून, महावितरणचे कर्मचारी आपल्या स्तरावर उपलब्ध साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा; सोलर प्लांट धोक्यात
धक्कादायक बाब म्हणजे आग लागून बराच वेळ झाला तरीही अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकला नाही. अग्निशमन दलाच्या या विलंबाचा फटका आता बसताना दिसत आहे. आग अधिकच पसरत चालली असून, महावितरण कार्यालयाच्या समोरच असलेल्या सोलर प्लांट (सौर ऊर्जा प्रकल्प) पर्यंत या आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.

सोलर प्लांटला आगीने वेढल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन बंब तात्काळ न पोहोचल्याने स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Related to this topic: