Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार; जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७,३२६ घरांची नोंद

शहराची प्राथमिक लोकसंख्या २८ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली आहे.


कळमनुरीची लोकसंख्या २८ हजारांच्या पार जनगणनेच्या प्राथमिक टप्प्यात ७३२६ घरांची नोंद

Kalamnuri Census Survey |

कळमनुरी (Kalamnuri Census Survey) : नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात राबविण्यात येत असलेल्या जनगणना मोहिमेचा प्राथमिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, या टप्प्यात संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कळमनुरी शहरात एकूण ७ हजार ३२६ घरांची नोंद करण्यात आली आहे. तसेच शहराची प्राथमिक लोकसंख्या २८ हजार ८७६ इतकी नोंदविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनगणना मोहिमेअंतर्गत गट क्रमांक ३८ मधील सर्व क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या प्रगणक आणि विशेष पथकांनी घराघरांत जाऊन माहिती संकलित केली. यामध्ये कुटुंबातील सदस्यसंख्या, घरांचे प्रकार तसेच विविध मूलभूत आणि नागरी सुविधांबाबतची माहिती नोंदविण्यात आली.

जनगणना मोहिमेचा हा टप्पा यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. नागरिकांनीही आवश्यक माहिती उपलब्ध करून देत सर्वेक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हे काम नियोजित कालावधीत पूर्ण होऊ शकले.

नगरपरिषद प्रशासनाच्या मते, या प्राथमिक जनगणनेमुळे शहराच्या लोकसंख्यावाढीचे आणि विस्ताराचे वास्तव चित्र समोर आले आहे. संकलित आकडेवारीचा उपयोग आगामी विकासकामांचे नियोजन, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छता सुविधा आणि इतर नागरी सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी होणार आहे.

तसेच, वाढत्या लोकसंख्येनुसार शासनाकडून मिळणाऱ्या निधीचे नियोजन आणि योग्य विनियोजन करण्यासाठीही ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. भविष्यातील प्रभागरचना, प्रशासकीय सुविधा आणि शहर विकास आराखडा तयार करतानाही या आकडेवारीचा महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे.

प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता नगरपरिषद प्रशासनाने डेटा पडताळणी आणि पुढील तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात केली असून, जनगणनेच्या पुढील टप्प्यातील कामकाजही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related to this topic: