Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Illegal Money Lending

सावकारीच्या जाचाला कंटाळून २५ कुटुंबांचे पलायन; आमदार बच्चू कडू यांची मध्यरात्री नणंद येथे भेट

निलंगा तालुक्यातील नणंद गावात बेकायदेशीर सावकारीच्या जाचाला कंटाळून तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


सावकारीच्या जाचाला कंटाळून २५ कुटुंबांचे पलायन आमदार बच्चू कडू यांची मध्यरात्री नणंद येथे भेट

Illegal Money Lending |

निलंगा : निलंगा तालुक्यातील नणंद गावात बेकायदेशीर सावकारीच्या जाचाला कंटाळून तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार बच्चू भाऊ कडू यांनी गुरुवारी (दि. ३० जुलै २०२६) मध्यरात्री १२.४५ वाजता मुसळधार पावसात नणंद गावाला भेट देत पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारी आणि काही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना कर्जाच्या नावाखाली मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असून, अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न सभागृहात ठामपणे उपस्थित केला होता. सावकार आणि काही फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक वसुली पद्धतीमुळे अनेक शेतकरी आणि कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता.

पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी, दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांचा छळ थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नणंद येथील घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: