Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सिद्धेश्वर धरण पुरवठा

हिंगोलीकरां च्या पाण्याची प्रतीक्षा लांबली; सिद्धेश्वर धरणातून पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित

Siddheshwar Dam Supply: सिदद्धेश्वर धरणापासून पुरवठा करत असलेल्या हिंगोलीलाकडून पाणी शुद्ध करणाऱ्या केंद्राचे वीज नाही, मग पाण्याचा पुरवठा ठप्प झाल्याने शहरात दुष्काळीचा परिणाम होतो.


हिंगोलीकरां च्या पाण्याची प्रतीक्षा लांबली सिद्धेश्वर धरणातून पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा खंडित

Siddheshwar Dam Supply |

हिंगोली (Siddheshwar Dam Supply) : शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. शहराला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो आणि डिग्रस कराळे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर शहरात वितरित केले जाते. मात्र सध्या या केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

14 जून रोजी 33 केव्ही लाईनवर फिल्टरच्या पाठीमागे ट्रायल घेतली असता कट पॉईंटवर आवाज आल्याचे समोर आले. या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत महावितरण चे अभियंता कामडी  यांना तातडीने फॉल्ट काढण्यासाठी कळवण्यात आले आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रात वीज नसल्याने पाणी उपसा आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 

वीज विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून विद्युत पुरवठा पूर्ववत होताच (Siddheshwar Dam Supply) पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.