Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंंगोली निवडणुक

हिंंगोलीत राहिलेल्या दोन माजी अधिकार्‍यांची निवडणुकीतून माघार

Hingoli Election:


हिंंगोलीत राहिलेल्या दोन माजी अधिकार्‍यांची निवडणुकीतून माघार

Hingoli Election |

हिंगोली (Hingoli Election) : जिल्ह्यात पुर्वी शासकीय सेवेत राहिलेल्या व नंतर राजकारणात गेलेल्या रामदास पाटील सुमठाणकर व साहेबराव कांबळे या दोघांनी घेतलेल्या माघारीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. कोरोना काळात हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहिलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी बदली झाल्या नंतर शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा व (Hingoli Election) विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिंगोलीतून उमेदवारी मागितली होती.

उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन सुमठाणकर यांनी हिंगोली विधानसभेची निवडणुक (Hingoli Election) अपक्ष म्हणुन लढविली होती. निवडणुकी नंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. काही दिवस हिंगोलीत राहिल्या नंतर त्यांनी नांदेड जिल्ह्यात बस्तान टाकले. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. गुरुवारी अचानक त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या राजकीय प्रवासा बद्दल हिंगोलीत चांगलीच चर्चा रंगत आहे.

सुमठाणकर यांच्याप्रमाणेच साहेबराव कांबळे हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी होते.सेवा निवृत्ती नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन उमरखेड विधान सभेची निवडणुक लढविली होती. ते पक्षातर्फे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी काँग्रेस पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळविली होती. गुरुवारी अचानक त्यांनी सुद्धा आपली उमेदवारी परत घेऊन महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.

हिंगोली जिल्ह्यातून गेलेल्या या दोन माजी अधिकार्‍यांनी घेतलेली माघार जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे दोघेही काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. दरम्यान, जिल्ह्याचे प्रभारी साहेबराव कांबळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून (Hingoli Election) माघार घेतल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन नाईक यांनी दिली.

Related to this topic: