Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र; हिंदू जागृती आवश्यक – मिलिंद परांडे


हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र हिंदू जागृती आवश्यक – मिलिंद परांडे

Hindu Unity |

वसमत (Hindu Unity) : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र हिंदूविरोधी शक्तींकडून सातत्याने रचले जात असल्याचा आरोप करत, या पार्श्वभूमीवर हिंदूंनी सावध राहून जागृती करण्याची गरज असल्याचे मत मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले. ते वसमत येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करत होते.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नगरसेवक सिताराम मॅनेवार यांच्या निवासस्थानी शहरातील समाजसेवक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मिलिंद परांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी त्यांच्यासोबत क्षत्रिय सहमंत्री अनंत पांडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे, विभाग मंत्री संदीप गोरे आणि प्रांत संघटन मंत्री गणेश मोकाशे उपस्थित होते.

गंभीर विषयांवर मार्गदर्शन

मिलिंद परांडे यांनी गोवंश संरक्षण, महिला सुरक्षा, लव्ह जिहाद आणि हिंदू लोकसंख्या यांसारख्या विविध गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. हिंदूंचा जन्मदर घटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत, प्रत्येक कुटुंबात किमान दोन ते तीन अपत्य असावीत, असे मत त्यांनी मांडले.

गोवंश संरक्षण ही काळाची गरज असून यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लव्ह जिहादच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना फसवण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करत, हा राष्ट्रीय चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर षडयंत्राचा आरोप

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर हिंदूंमध्ये मनभेद निर्माण करून धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ ऐवजी इतर नोंद करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध जाती-समूहांमध्ये गैरसमज पसरवून हिंदूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपला धर्म जो असेल तोच जनगणनेत नोंदवणे आवश्यक आहे. या कुटिल कारस्थानापासून सावध राहून जागृती करणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

इतर राज्यांतील उदाहरणे

इतर राज्यांमध्ये आदिवासी समाजाला हिंदू म्हणून नोंद करू नये, असे सांगितले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्रात वीरशैव-लिंगायत समाजात मनभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे सर्व नियोजनबद्ध षडयंत्र असून प्रबोधनाच्या माध्यमातून ते हाणून पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीसाठी विविध क्षेत्रातील नागरिक, विचारवंत, व्यापारी, डॉक्टर आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: