Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

Heavy Rain

अतिवृष्टीचा तडाखा! कुरखेड्यात दोन तलाव फुटले; शेकडो एकर धान पिकाची नासाडी

कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे.


अतिवृष्टीचा तडाखा कुरखेड्यात दोन तलाव फुटले शेकडो एकर धान पिकाची नासाडी

Heavy Rain |

गूरनोली व बिजापूर येथे घटना; शेतकरी व मच्छीमारांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

कुरखेडा : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गूरनोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मध्यरात्री गूरनोली येथील मोठ्या तलावाची पार फुटून मोठे भगदाड पडले. त्यामुळे तलावाखालील शेकडो एकर शेतजमिनीत पाणी शिरून धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यंदा तालुक्यात नुकताच धान रोवणीचा हंगाम पूर्ण झाला असून पिके जोमाने वाढू लागली होती. मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्याने मोठ्या वेगाने आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अनेक शेतांतील धान पीक वाहून गेले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे.

याशिवाय तलावाच्या पारीलगत असलेल्या आठ ते दहा एकर शेतजमिनीत मुरूम, रेती व गाळाचा जाड थर साचल्याने ती जमीन लागवडीस अयोग्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या समोर उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे.

या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

दरम्यान, दुसरी घटना बिजापूर येथे घडली. येथील जुना मामातलावाची पार फुटल्याने सुमारे ६५ किलो मत्स्यबीज वाहून गेले. तसेच शेकडो एकर क्षेत्रावरील धान पीकही वाहून गेल्याने शेतकरी व मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट यांच्यासह प्रभाकर तुलावी व दिलीप दर्रो यांनी केली आहे.

Related to this topic: