Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ विक्रीचा निर्धार

हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले.


भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ विक्रीचा निर्धार

Grocery Association |

कळमनुरीतील किराणा व्यापाऱ्यांचा सुट्या खाद्यतेल विक्री बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

कळमनुरी (Grocery Association) : अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरातील किराणा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या, ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आणि व्यवसायातील गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने कळमनुरी किराणा असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत किराणा व्यवसायाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले. ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानात स्वच्छता राखणे, भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थांची विक्री करणे, मुदतबाह्य वस्तू विक्रीस न ठेवणे तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुट्या खाद्यतेल विक्रीला पूर्णविराम

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शहरातील कोणत्याही किराणा दुकानात सुट्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री न करण्याचा ठराव. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केवळ नामांकित कंपन्यांचे पॅकबंद खाद्यतेलच विक्रीस ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने मंजूर केला.

ग्राहकहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन

यावेळी मार्गदर्शन करताना नंदकिशोर तोष्णीवाल यांनी ग्राहकांना सुरक्षित, शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही व्यापाऱ्यांची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करताना दुकानातील स्वच्छता, वस्तूंची गुणवत्ता आणि नियमांचे काटेकोर पालन यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच मुदतबाह्य वस्तूंसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवावी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेकडे दडपण म्हणून न पाहता ग्राहकहिताच्या दृष्टीने सकारात्मकतेने पाहावे, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस जावेद किराणा, आनंद प्रोव्हिजन, जिया बेग किराणा, जयश्री किराणा, नईम शिरमी, बेग किराणा, संजरी किराणा, महारुद्र ट्रेडिंग, केजीएन किराणा, मुखीद बेग, जाकीर किराणा, शिवराज ट्रेडर्स, कोहिनूर ट्रेडिंग कंपनी, स्वास्तिक प्रोव्हिजन, पारसनाथ किराणा, अनिल वीरचंद राके, स्वामी समर्थ किराणा, प्रकाश प्रोव्हिजन, श्रीकांत मांडवगडे, अंकित साकळे, न्यू केशर ट्रेडिंग यांच्यासह शहरातील अनेक किराणा व्यापारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी ग्राहकांना भेसळमुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून कळमनुरीतील किराणा व्यवसाय अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related to this topic: