Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा

बीडमधील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी भरलेली बोट गोदावरीत उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले.


बीडमधील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी भरलेली बोट गोदावरीत उलटली बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Godavari river boat accident |

माजलगाव तालुक्यातील दुर्घटनेत ५० ते ६० भाविक बोटीत असल्याची माहिती; २० जणांची सुटका, बेपत्ता भाविकांचा शोध सुरू

बीड (Godavari river boat accident) : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले. गोदावरी नदीपात्रातून प्रवास करणारी भाविकांची बोट अचानक उलटल्याने गंभीर दुर्घटना घडली असून प्रशासन आणि स्थानिकांकडून तातडीने बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत सुमारे ५० ते ६० भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर स्थानिक बोट चालक तसेच प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आहे. गोदावरी नदी पार करण्यासाठी भाविकांना बोटींचा वापर करावा लागतो. दरम्यान, अधिक उत्पन्नाच्या हेतूने काही बोटींमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे.

याच निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा सुरू असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याने बोट नदीपात्रात उलटल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातात काही लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता अधिक गंभीर मानली जात आहे.

बोटीत अंदाजे ६० जण असल्याचे सांगितले जात असून त्यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित भाविकांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात बचावकार्य अखंडपणे सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Related to this topic: