Breaking News
  • 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे
  • मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नकार दिला
  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!
  • शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना
  • गोकुळ निवडणुकीत ‘हलाल सर्टिफिकेट’चा नवा वाद
  • कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार
  • व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकाऱ्यांकडून कांदा खरेदी व्हावा ही मागणी- देवेंद्र फडणवीस
  • गडचिरोली जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला
  • वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

आलेगाव येथे भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

Free Water Tanker |

सेवा हीच आमची ओळख – “कामं बोलतंय कामं”

आलेगाव (Free Water Tanker) : आलेगाव येथे भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आलेगाव परिसरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून अनेक माय-माऊलींना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांच्या विनंतीला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपत निलेश कापकर यांच्या पुढाकारातून हा मोफत पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रात्री १२ वाजता सुद्धा पाण्याअभावी त्रस्त असलेल्या नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

“सेवा हीच आमची ओळख” आणि “कामं बोलतंय कामं” या भूमिकेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, आमचे समाधान काका गवळी हे स्वतः टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आले असताना शेत परिसरात अचानक टँकरवरून त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर व ठीक असल्याची माहिती देण्यात आली.

लोकांच्या सततच्या मागणीमुळे आज रात्रभर मोफत टँकरद्वारे पाणी वाटप सुरूच राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या वेळी नितीन ढोणे, नाजीम भाई, सखाराम लहामगे, शेपी भाई, शंकर लहामगे, सागर चांगले, केशव लहामगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related to this topic: