Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

Flood Alert

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना शहरात न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

आषाढी वारी २०२६ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


आळंदीत इंद्रायणी नदीला पूर चारही पूल पाण्याखाली वारकऱ्यांना शहरात न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

Flood Alert |

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पूरस्थिती गंभीर; नदीपात्र, घाट आणि बंद पुलांपासून दूर राहण्याच्या सूचना

आषाढी वारी २०२६ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून, प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना सध्या आळंदीकडे येणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सततच्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा फटका आळंदी शहराच्या संपर्क व्यवस्थेलाही बसला आहे. शहराला जोडणारे चारही प्रमुख पूल जलमय झाल्याने आळंदीत प्रवेश करणे सध्या धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने हे मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आळंदीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांना प्रशासनाने विशेष विनंती केली आहे. प्रवास सुरू केलेल्या नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीत शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न न करता ज्या ठिकाणी सुरक्षित आहेत, तेथेच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पूरस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस प्रशासनाने नदीपात्र, घाट परिसर तसेच पाण्याखाली गेलेल्या पुलांच्या परिसरात जाण्यास सक्त मनाई केली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदी आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, सोशल मीडियावरील किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू असून, नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. मात्र, यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रथम स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related to this topic: