Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Farmer Suicide

माळवटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.


माळवटा येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

वसमत तालुक्यातील माळवटा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती संकटात आली असून आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माळवटा येथील संभाजी टोमके (वय 35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मयत हे अल्पभूधारक शेतकरी होते. निसर्गाचा लहरीपणा, सततची नापिकी तसेच पावसाअभावी सुगी हातची जाण्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.

नेहमीप्रमाणे ते शेतात गेले; मात्र परत आले नाहीत. त्यानंतर ते शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब समजताच कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांना तातडीने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी बेगाजी टोमके यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार भुरके पुढील तपास करीत आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना माळवटा येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: