Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अवकाळी पावसाने बाधित ११ जिल्ह्यांना १४.५८ कोटींची मदत; हिंगोलीतील २९ शेतकऱ्यांना लाभ

एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीचे वितरण मंजूर केले आहे.


अवकाळी पावसाने बाधित ११ जिल्ह्यांना १४५८ कोटींची मदत हिंगोलीतील २९ शेतकऱ्यांना लाभ

Farmer Relief Fund |

हिंगोली (Farmer Relief Fund) : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांच्या मदत निधीचे वितरण मंजूर केले आहे. महसूल व वन विभागाने १२ जून रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील ११ जिल्ह्यांतील एकूण १६ हजार २६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात हिंगोली जिल्ह्यातील २९ शेतकऱ्यांच्या १५.२० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २ लाख ७३ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील ३ हजार २८२ शेतकऱ्यांसाठी २ कोटी ९१ लाख ८ हजार रुपये, तर धाराशिव जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांसाठी २ लाख ६६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या विभागासाठी एकूण २ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुणे विभागात सर्वाधिक मदत जाहीर झाली असून सांगली जिल्ह्यातील ८ हजार ८९७ शेतकऱ्यांना ७ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यासाठी १ कोटी ४६ लाख ३३ हजार, सातारा जिल्ह्यासाठी २१ लाख ८८ हजार, पुणे जिल्ह्यासाठी २६ लाख ६० हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३५ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे विभागासाठी एकूण ९ कोटी ५८ लाख ७५ हजार रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे.

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार २५१ शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ७३ हजार रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील १ हजार ३६३ शेतकऱ्यांसाठी ५६ लाख ३२ हजार रुपये, तर वाशीम जिल्ह्यातील १६८ शेतकऱ्यांसाठी २२ लाख ६३ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या विभागासाठी एकूण २ कोटी ३ लाख ६८ हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.

राज्यातील एकूण ८ हजार ८९.१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत जाहीर करण्यात आली असून, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: