Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Electrocution Death

शेळीसाठी पाला आणताना झाडावरच शॉक लागून एकाचा मृत्यू; फांदी मेन लाईनला लागल्याने दुर्दैवी घटना

झरी बुद्रुक येथे शेळीसाठी पाला आणताना फांदी मेन लाईनवर पडल्याने शॉक लागून ४२ वर्षीय अशोक जाधव यांचा जागीच मृत्यू.


शेळीसाठी पाला आणताना झाडावरच शॉक लागून एकाचा मृत्यू फांदी मेन लाईनला लागल्याने दुर्दैवी घटना

Electrocution Death |

चाकूर (Electrocution Death) : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक येथे शेळीसाठी पाला आणण्यासाठी झाडावर चढून फांदी तोडत असताना ती फांदी सब स्टेशनला गेलेल्या मेन लाईनवरील विद्युत तारेवर पडल्याने शॉक लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजता घडली.

मृत व्यक्तीचे नाव अशोक बाबुराव जाधव (वय ४२) असे आहे. ते शुक्रवारी सकाळी शेळ्यांसाठी पाला आणण्यासाठी गावाजवळील एका झाडावर चढून फांदी तोडत होते. यावेळी तोडलेली फांदी सब स्टेशनला गेलेल्या मेन लाईनवर पडल्याने ओल्या फांदीतून विद्युत प्रवाह प्रवाहित झाला आणि त्यांना जोराचा शॉक बसला. या दुर्घटनेत त्यांचा झाडावरच मृत्यू झाला. काही वेळ त्यांचा मृतदेह झाडावरच लटकलेल्या अवस्थेत होता.

अशोक जाधव हे वडार समाजातील गरीब कुटुंबातील होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या चार अपत्यांपैकी तीन मुले मूकबधिर असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: