Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वरोली चक्रीवादळी नुकसान

वरोली- सेवादासनगर परिसरात चक्रीवादळ; अनेकांची घरावरील टिनपत्रे उडाली!

Varoli cyclone damage: वरोली-सेवादासनगर येथे चक्रीवादळाने घरांची टिनपत्रे उडवले, फळबाग आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला आर्थिक मदत मागितली.


वरोली- सेवादासनगर परिसरात चक्रीवादळ अनेकांची घरावरील टिनपत्रे उडाली 

Varoli cyclone damage |

मानोरा (Varoli cyclone damage) : तालुक्यातील वरोली - सेवादासनगर परिसरात दि. १३ मे रोजी दुपारच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह चक्रीवादळाने तांडव माजविल्याने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून अतोनात नुकसान झाले आहे. 
 
सविस्तर असे की, बुधवारी सकाळपासून वरोली - सेवादासनगर परिसरात आभाळ दाटून आले होते. दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास अचानकच अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने सुरुवात केली. सुसाट्याचा चक्रीवादळाच्या वाऱ्याने अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून अतोनात नुकसान झाले आहे. तर या (Varoli cyclone damage) भागातील फळबाग व भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. या चक्रीवादळाच्या तांडवात काही वेळातच होत्याचे नव्हते झाल्याने प्रशासनाने पाहणी व पंचनामे करून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी बाधीत नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.
  
सेवादासनगर येथील अत्यल्प भूधारक शेतकरी मनोहर बाबाराव राठोड यांच्या घरावरील टिनपत्रे उडून घरांचीही अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.