Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > पुणे

रायगड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना; आईने चार मुलांना विष दिल्यानंतर स्वतःही जीवन संपवले; दोन मुलांचा मृत्यू, दोघे गंभीर

आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.


रायगड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आईने चार मुलांना विष दिल्यानंतर स्वतःही जीवन संपवले दोन मुलांचा मृत्यू दोघे गंभीर

Cold Drink Poisoning |

रायगडच्या खरवली आदिवासी वाडीत घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा; पोलीस तपास सुरू

रायगड (Cold Drink Poisoning) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीत अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, जन्मदात्या आईने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष प्राशन करवून स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.

या घटनेतील मृत महिलेचे नाव आशा जाधव (वय २९ वर्षे) असे असून, त्यांच्यासोबतच त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय ७ वर्षे) आणि दुर्वा जाधव (वय ६ वर्षे) या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव यांनी प्रथम आपल्या चारही मुलांना थंडपेयामध्ये विष मिसळून दिले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळातच सर्वांची तब्येत अचानक बिघडल्याने हा प्रकार शेजारी आणि नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच आई आणि दोन मुलींचा मृत्यू झाला.

या घटनेत आशा जाधव यांची आणखी दोन मुले गंभीर जखमी असून त्यांच्यावर माणगाव येथील सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तसेच रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, या टोकाच्या पावलामागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. संपूर्ण खरवली परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: