Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Cattle Rescue

वसमतमध्ये गोवंश क्रूरतेच्या निषेधार्थ 31 जुलैला वसमत बंद

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात कत्तलीच्या उद्देशाने 19 गोवंश जनावरे अन्न-पाण्याविना शेतात डांबून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.


वसमतमध्ये गोवंश क्रूरतेच्या निषेधार्थ 31 जुलैला वसमत बंद

सकल हिंदू समाजाच्या बैठकीत एकमताने ठराव पारित

हिंगोली : वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात कत्तलीच्या उद्देशाने 19 गोवंश जनावरे अन्न-पाण्याविना शेतात डांबून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून सर्व गोवंशांची सुटका केली असून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी दि. 30 जुलै रोजी सकल हिंदू समाज, वसमत यांची मोंढा मारोती मंदिर येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दि. 31 जुलै रोजी वसमत शहर बंद पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

बैठकीला शहरातील व्यापारी, गोरक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदच्या दिवशी सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी "गौमातेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे," अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, 31 जुलैच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला आहे.

Related to this topic: