Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

उमेदवारी अर्ज मागे घेणे शैलेश अग्रवाल यांना महागात; काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी काँग्रेसने माजी उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.


उमेदवारी अर्ज मागे घेणे शैलेश अग्रवाल यांना महागात काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई

Candidate Withdrawal Controversy |

विधान परिषद निवडणुकीतील घडामोडीनंतर पक्षाचा कठोर निर्णय; सदस्यत्वही रद्द

वर्धा (Candidate Withdrawal Controversy) : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी काँग्रेसने माजी उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शिस्तभंगाची कारवाई करत अग्रवाल यांना पक्षातून निलंबित केले असून त्यांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पक्षाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शैलेश अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना न देता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्षाची राजकीय अडचण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पक्ष शिस्तीचे उल्लंघन आणि संघटनात्मक हिताला धक्का पोहोचविल्याचा ठपका ठेवत अग्रवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जिल्हा काँग्रेसची होती कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणानंतर वर्धा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कोल्हे यांनीही प्रदेश नेतृत्वाकडे अग्रवाल यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविलेल्या पत्रात पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला होता.

कोल्हे यांनी पत्रात नमूद केले की, महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अग्रवाल यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक पूर्ण ताकदीने कामाला लागले होते. प्रचारयंत्रणा उभी राहिली असताना अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि पक्षाची मोठी राजकीय हानी झाली.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अग्रवाल यांनी अचानक माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर नाराजी दर्शवित पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रदेश नेतृत्वानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी काळात पक्षविरोधी किंवा पक्षशिस्त मोडणाऱ्या कृतींविरोधात काँग्रेस अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पक्षांतर्गत चर्चांना उधाण

या कारवाईनंतर वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडीमुळे पक्षांतर्गत समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: