Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आरोग्य

रुग्णवाहिका महिला प्रसूती

रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसूती

Ambulance Childbirth Case: काशी तांडा येथे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला दीड तास वाट पाहावी लागली. अखेर खाजगी वाहनातून रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती


रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसूती

Ambulance Childbirth Case |

 

हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!

हिंगोली (Ambulance Childbirth Case) : हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला दीड तास वाट पाहावी लागली. अखेर खाजगी वाहनातून रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती झाली.  

मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथील गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिके साठी संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिलेला दीड तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नातेवाईकांनी तिला खाजगी वाहनातून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.  

रुग्णालयात (Ambulance Childbirth Case) पोहोचण्यापूर्वीच वाटेतच महिलेची प्रसूती झाली. तातडीने आई आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  
 
राज्याचे आरोग्यमंत्री सातत्याने नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देतात. विधानसभेतही याबाबत माहिती दिली होती. मात्र गेल्या 6 महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. आज पुन्हा एकदा याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली.  
या गंभीर प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिकांची अनुपलब्धता हा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.