Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

Parliament Monsoon Session

संसदेत राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे आंदोलन; ‘चर्चेपासून पळू नका’, भाजपचा घणाघात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.


संसदेत राहुल गांधींविरोधात nda खासदारांचे आंदोलन ‘चर्चेपासून पळू नका’ भाजपचा घणाघात

Parliament Monsoon Session |

NEET पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलन आणि झारखंडमधील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक; अमित शहा उत्तर देण्यास तयार असल्याचा भाजपचा दावा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज या मुद्द्यांवरून विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तराची मागणी केली जात आहे. याचदरम्यान आता NDA खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात संसद परिसरात आंदोलन करत थेट हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी चर्चेसाठी सभागृहात उपस्थित राहावे आणि चर्चेपासून दूर जाऊ नये, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. झारखंडमधील रांची येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे खासदार आक्रमक झाले आहेत.

भाजपच्या म्हणण्यानुसार, अमित शहा संसदेत विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर उत्तर देण्यास तयार आहेत. मात्र, सरकार उत्तर देण्याच्या तयारीत असताना राहुल गांधी आणि विरोधक सभागृहातून बाहेर पडत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

‘राहुल भागना नहीं’ हॅशटॅग मोहीम

भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘राहुल भागना नहीं’ या हॅशटॅगसह मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

जेपी नड्डा यांनी जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. जंतर-मंतरवर गोळीबार झालेला नाही, असा दावा करत त्यांनी राहुल गांधींना संसदेत येऊन चर्चेत सहभागी होण्याचे आव्हान दिले.

सरकारकडून उत्तर देण्याची तयारी असतानाही विरोधक सभागृहातून बाहेर पडत असल्याचे नड्डा यांनी म्हटले. काँग्रेसकडून चर्चेची मागणी केली जाते; मात्र सरकारची बाजू ऐकण्याची वेळ आली की विरोधक सभागृह सोडतात, असा आरोप त्यांनी केला.

‘गृहमंत्री प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार’

जेपी नड्डा यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधींना जंतर-मंतरचा मुद्दा संसदेत चर्चेसाठी आणायचा आहे; मात्र सरकार चर्चेसाठी तयार असताना ते मागे हटत असल्याचा भाजपचा आरोप आहे. गृहमंत्री अमित शहा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहेत, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

सरकारने यापूर्वीही संसदेत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली असून, त्याची नोंद संसदीय कामकाजात उपलब्ध असल्याचा दावा नड्डा यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांचाही राहुल गांधींवर निशाणा

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे राहुल गांधी आणि विरोधकांवर निशाणा साधला. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, त्याचप्रमाणे प्रश्नांची उत्तरे ऐकण्याची जबाबदारीही असते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अमित शहा विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर भूमिका मांडण्यास तयार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. काँग्रेससह विरोधकांनी वस्तुस्थिती स्वीकारून सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवावी आणि सरकारची उत्तरे पूर्णपणे ऐकावीत, असे आवाहन त्यांनी केले.

लोकशाहीमध्ये चर्चेतून प्रतिष्ठा वाढते, चर्चेपासून दूर गेल्याने नाही, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टोला लगावला.

Related to this topic: