Saint Muktabai Palkhi: साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली.
चिखली (Saint Muktabai Palkhi) : साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनानिमित्त चिखली शहरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
चिखली शहराच्या सीमेवर श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने पालखीचे तसेच पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकरी, भाविक व सेवेकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांसाठी अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. मार्गावरील विविध ठिकाणीही सामाजिक संस्था, मंडळे व नागरिकांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
या (Saint Muktabai Palkhi) पालखीच्या सेवेत चिखली तालुक्यातील आंतरवाडी येथील शेतकरी मित्र सचिन बोंद्रे आणि स्वप्निल उर्फ आपूशेठ गुप्ता हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या बैलजोडीची सेवा देत आहेत. बुलढाणा घाटातील चढणीपासून ते देऊळगाव राजा परिसरापर्यंत पालखी रथ ओढण्यासाठी ते आपल्या बैलांची निःस्वार्थ सेवा अर्पण करतात. त्यांच्या या सेवाभावाचे वारकरी संप्रदायातून कौतुक होत आहे.
सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करणारी आणि साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची ही पालखी महाराष्ट्रातील सर्वात मानाच्या आणि ऐतिहासिक पालख्यांपैकी एक मानली जाते. मार्गातील प्रत्येक गावात भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतात आणि "जय मुक्ताई"च्या गजरात पालखीचे स्वागत करतात. (Saint Muktabai Palkhi) संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या चिखली आगमनामुळे शहरात वारकरी संप्रदायाचा भक्तिरस ओसंडून वाहत असून, विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.