Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आणखी > अध्यात्म

संत मुक्ताबाई पालखी

350 वर्षांची परंपरा जपणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचे चिखलीत उत्स्फूर्त स्वागत

Saint Muktabai Palkhi: साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली.


350 वर्षांची परंपरा जपणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचे चिखलीत उत्स्फूर्त स्वागत

Saint Muktabai Palkhi |

चिखली (Saint Muktabai Palkhi) : साडेतीनशे वर्षांची अखंड परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करून मंगळवारी (दि. ३०) चिखली शहरात दाखल झाली. पालखीच्या आगमनानिमित्त चिखली शहरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

चिखली शहराच्या सीमेवर श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने पालखीचे तसेच पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकरी, भाविक व सेवेकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांसाठी अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. मार्गावरील विविध ठिकाणीही सामाजिक संस्था, मंडळे व नागरिकांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या (Saint Muktabai Palkhi) पालखीच्या सेवेत चिखली तालुक्यातील आंतरवाडी येथील शेतकरी मित्र सचिन बोंद्रे आणि स्वप्निल उर्फ आपूशेठ गुप्ता हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या बैलजोडीची सेवा देत आहेत. बुलढाणा घाटातील चढणीपासून ते देऊळगाव राजा परिसरापर्यंत पालखी रथ ओढण्यासाठी ते आपल्या बैलांची निःस्वार्थ सेवा अर्पण करतात. त्यांच्या या सेवाभावाचे वारकरी संप्रदायातून कौतुक होत आहे.

सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करणारी आणि साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची ही पालखी महाराष्ट्रातील सर्वात मानाच्या आणि ऐतिहासिक पालख्यांपैकी एक मानली जाते. मार्गातील प्रत्येक गावात भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतात आणि "जय मुक्ताई"च्या गजरात पालखीचे स्वागत करतात. (Saint Muktabai Palkhi) संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या चिखली आगमनामुळे शहरात वारकरी संप्रदायाचा भक्तिरस ओसंडून वाहत असून, विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.