Congress Association: पातूर येथे आयोजित काँग्रेस सूजन संघटन अभियानात अनेक मान्यवरांची उपस्थिती. लोकशाही पद्धतीने जिल्हाध्यक्ष पदाची निवड. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य.
पातूर (Congress Association ) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “काँग्रेस सूजन संघटन अभियान” अंतर्गत पातूर येथे महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले. पातूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल संगम लॉन येथे ही सभा उत्साहात पार पडली. या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अकोला जिल्हा निरीक्षक तसेच आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष जी. रुद्राजी राजू प्रमुख उपस्थित होते. यावेळी निरीक्षक म्हणून संदेश सिंगलकर व दिलीप सरनाईक यांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाची (Congress Association) सुरुवात पातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे व शहराध्यक्ष शेख मुख्तार यांच्या हस्ते मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने झाली. यानंतर जी. रुद्राजी राजू यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हाध्यक्ष पदाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांच्या नावांची शिफारस कार्यकर्त्यांनी निःसंकोचपणे मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.
सभेदरम्यान (Congress Association) तालुका व शहराध्यक्ष पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच अकोला जिल्हाध्यक्ष पदासाठी नावांची शिफारस करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बंद खोलीत प्रत्येक कार्यकर्त्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांची नोंद करण्यात आली.
या (Congress Association) कार्यक्रमास अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, काँग्रेस नेते प्रकाश तायडे, नाना देशमुख, हाजी सै. कमरोद्दीन, हिदायत खान, मोहम्मद शब्बीर भाई, हेमंत देशमुख, प्रशांत गावंडे, समाधान राठोड, राजाराम डाखोरे, रमेश भगत, बब्बू भाई, अज़गर भाई, राजेश अत्तरकार, मोहसिन खान, अनीक पटेल, मोहम्मद महताब, गुड्डू पहलवान, दौलतराव घुगे, भिमराव कोथलकर, अतुल अमानकर, मोहम्मद हयात जमदार, रंजनी ताई मुंडे, चंद्रकांत बारताशे, श्याम राठोड, मोहम्मद ज़फर, विजू गोतरकर, बंटी गहिलोत, रमेश सोलंके, गजानन अलाट, प्रशांत देशमुख, विलास हरमकार, अनिल महैसने, मोहम्मद शारीक यांच्यासह तालुका व शहरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमुळे काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.