Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > महाराष्ट्र

आ. विजय वडेट्टीवार

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले..

MLA Vijay Wadettiwar: गोसेखुर्द च्या पाण्याचे साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुटका घेतली. शेतकऱ्यांचा आंदोलन थांबवून, दि. १७ जुलै कोळी १० वाजता पाणी सोडले जाते. विजय वडेट्टीवार यांनी अल्टिमेटम


विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले 

MLA Vijay Wadettiwar |

 

उद्या सकाळी १० वाजता गोसेखुर्दचे पाणी सोडणार
शेतकऱ्यांच्या मागणीला यश; प्रशासनाची तातडीने दखल

चंद्रपूर (MLA Vijay Wadettiwar) : विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द धरणातून दोन दिवसांत सिंचनासाठी पाणी न सोडल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशाराव शेतकऱ्यांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असून उद्या दि.१७ जुलै सकाळी १० वाजता गोसेखुर्द चे पाणी सोडणार असल्याचे कळविले आहे.

ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, सावली तसेच परिसरातील हजारो शेतकरी पाण्याअभावी संकटात सापडले आहेत. धानासह अन्य पिके करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर केवळ एका दिवसात प्रशासनाने निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी सांगितले की, "हा विजय माझा नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याचा आहे. प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे हजारो हेक्टर शेतीला दिलासा मिळणार आहे. मात्र, भविष्यात अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी."सोबतच गोसेखुर्द कालव्याची प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून शेती हंगामात शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी मुबलक पाणी पुरवठा व्हावा याची वेळोवेळी काळजी संबंधित विभागाने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

गोसेखुर्दचे पाणी नियोजित वेळेत सोडले जाणार असल्याने सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर झुकावे लागल्याची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. मतदार संघाचे प्रश्न असो अथवा राज्यातील कुठलेही प्रश्न असो आपल्या आक्रमक शैलीत न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच हिरीरीने प्रयत्न करतात. प्रत्येक सामन्याला न्याय मिळवून देणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असून लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असल्याने लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे असे मत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी यावेळी व्यक्त केले.

Related to this topic: