Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > महाराष्ट्र

ESIC योजना

नोकरी गेली तरी 'नो टेन्शन'; आता मिळणार 3 महिन्यांपर्यंत आर्थिक मदत

ESIC Yojana: पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.


नोकरी गेली तरी नो टेन्शन आता मिळणार 3 महिन्यांपर्यंत आर्थिक मदत

ESIC Yojana |

ESICची मोठी योजना; बेरोजगार विमाधारक कर्मचाऱ्यांना देणार 90 दिवसांपर्यंत 50% पगार

नवी दिल्ली (ESIC Yojana) : नोकरी गमावलेल्या विमाधारक कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला आता 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.

या (ESIC Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने बेरोजगार होण्यापूर्वी किमान 12 महिने विमायोग्य रोजगारात असणे आवश्यक आहे. तसेच, बेरोजगारीपूर्वीच्या 12 महिन्यांतील एका पूर्ण योगदान कालावधीत किमान 78 दिवस ईएसआयसीमध्ये योगदान केलेले असणे गरजेचे आहे. गैरवर्तन, टाळेबंदी, निवृत्ती किंवा ईएसआय कायद्यांतर्गत चुकीचे निवेदन केल्यामुळे झालेल्या बेरोजगारीला या योजनेचा लाभ मिळत नाही.

थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम

योजनेअंतर्गत (ESIC Yojana) दावा प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे बेरोजगारीच्या काळात कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते.