Vasantrao Naik Award: आधुनिक कृषी तकनीकांचा वापर करणाऱ्या हिंगोलीच्या अनिल जाधव यांना शाश्वत व नाविन्यपूर्ण शेतकरी पद्धतीसाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
हिंगोली (Vasantrao Naik Award) : हिंगोली तालुक्यातील मौजे माळहिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गंगाराम जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2023-24 या वर्षासाठीचा (Vasantrao Naik Award) ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार-2024’ (सर्वसाधारण गट) आज प्रदान करण्यात आला. आज मुंबई येथील डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनिल जाधव यांनी आधुनिक, शाश्वत व नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार (Vasantrao Naik Award) प्रदान करण्यात आला आहे. या यशाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब, मंडळ कृषी अधिकारी गणेश पवार तसेच कृषी विभाग, हिंगोलीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनिल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.