Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

Rural Postal Life Insurance

RPLIसाठी आता ग्रामीण भागात राहण्याची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम

टपाल विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेत पात्रतेसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.


rpliसाठी आता ग्रामीण भागात राहण्याची गरज नाही जाणून घ्या नवे नियम

ग्रामीण भागात राहण्याची अट हटवली; सक्रिय KYC असलेले पोस्ट ऑफिस किंवा शेड्यूल्ड बँकेतील बचत खाते आवश्यक

टपाल विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेत पात्रतेसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वास्तव्य ग्रामीण भागात असणे आवश्यक होते. मात्र, आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहरांमध्ये राहणाऱ्या पात्र नागरिकांनाही RPLI पॉलिसी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नव्या नियमांनुसार, RPLIसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक किंवा कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील सक्रिय आणि KYC पूर्ण झालेले बचत खाते असणे आवश्यक आहे. संबंधित खाते बंद, फ्रीज, ब्लॉक किंवा निष्क्रिय असता कामा नये. मात्र, केवळ बचत खाते असल्याने विमा पॉलिसी आपोआप मंजूर होणार नाही. वय, विम्याची रक्कम आणि लागू असलेले अंडररायटिंगचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील.

RPLIसाठी वयोमर्यादा किती?

RPLI योजनेसाठी १९ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. ज्या अर्जदारांकडे अधिकृत वयाचा पुरावा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी वयोमर्यादा १९ ते ४५ वर्षे अशी आहे. या योजनेसाठी महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ज करता येतो.

RPLI अंतर्गत कोणत्या पॉलिसी मिळतात?

ग्रामीण नागरिकांना जीवन विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने २४ मार्च १९९५ रोजी RPLI योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत ग्राम सुरक्षा, ग्राम संतोष, ग्राम सुविधा, ग्राम प्रिया आणि बाल जीवन विमा अशा विविध पॉलिसी उपलब्ध आहेत. मुलांसाठी जास्तीत जास्त दोन पॉलिसी घेता येतात.

सरेंडर व्हॅल्यू आणि कर्जाची सुविधाही

पॉलिसीच्या अटी व नियमांनुसार, तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरेंडर व्हॅल्यू आणि कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. काही अर्जदारांसाठी वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असू शकते. ३५ वर्षांपेक्षा अधिक वय किंवा २५,००० रुपयांपेक्षा जास्त विमा रक्कम असल्यास मेडिकल तपासणी लागू होण्याची शक्यता आहे. एका पॉलिसीसाठी जास्तीत जास्त तीन नॉमिनी देता येतात.

PLI आणि RPLIमध्ये काय फरक?

पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) या दोन स्वतंत्र योजना आहेत. PLIचा लाभ सरकारी, अर्ध-सरकारी कर्मचारी तसेच काही विशिष्ट व्यावसायिकांना मिळतो. दुसरीकडे, RPLIची पात्रता आता केवळ ग्रामीण भागातील रहिवाशांपुरती मर्यादित राहिलेली नाही.

त्यामुळे शहरात राहणाऱ्या पात्र नागरिकांसाठीही आता RPLI हा जीवन विम्याचा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

Related to this topic: