Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

ESIC योजना

नोकरी गेली तरी 'नो टेन्शन'; आता मिळणार 3 महिन्यांपर्यंत आर्थिक मदत

ESIC Yojana: पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.


नोकरी गेली तरी नो टेन्शन आता मिळणार 3 महिन्यांपर्यंत आर्थिक मदत

ESIC Yojana |

ESICची मोठी योजना; बेरोजगार विमाधारक कर्मचाऱ्यांना देणार 90 दिवसांपर्यंत 50% पगार

नवी दिल्ली (ESIC Yojana) : नोकरी गमावलेल्या विमाधारक कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला आता 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विमाधारकांना बेरोजगारीच्या काळात त्यांच्या सरासरी दैनंदिन कमाईच्या 50 टक्के दराने आर्थिक मदत मिळू शकते. ही मदत कमाल 90 दिवसांपर्यंत दिली जाते.

या (ESIC Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने बेरोजगार होण्यापूर्वी किमान 12 महिने विमायोग्य रोजगारात असणे आवश्यक आहे. तसेच, बेरोजगारीपूर्वीच्या 12 महिन्यांतील एका पूर्ण योगदान कालावधीत किमान 78 दिवस ईएसआयसीमध्ये योगदान केलेले असणे गरजेचे आहे. गैरवर्तन, टाळेबंदी, निवृत्ती किंवा ईएसआय कायद्यांतर्गत चुकीचे निवेदन केल्यामुळे झालेल्या बेरोजगारीला या योजनेचा लाभ मिळत नाही.

थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम

योजनेअंतर्गत (ESIC Yojana) दावा प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे बेरोजगारीच्या काळात कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी करण्यास मदत होते.