Slaughter of cattle: पाथरी पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेले १८ गोवंश जनावर एका शेडमध्ये आढळून आले. या घटनेत आरोपी नूरमिया शहाबुद्दीन यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांची कारवाई बेकायदेशीर कृत्यांविरोधात होती.
एकावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल अवैध गोवंश कत्तल करणार्यांमध्ये खळबळ...!
परभणी (Slaughter of cattle) : पाथरी शहरातील मूर्तुजा कॉलनी परिसरात कत्तलीसाठी आणून ठेवण्यात आलेल्या १८ गोवंश जनावरांची सुटका करत पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलिसांना शनिवार ६ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, मूर्तुजा कॉलनी येथील मशीदसमोरील मोकळ्या जागेत व शेडमध्ये काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून बांधून ठेवण्यात आली आहेत.
या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी आणि त्यांच्या सहकार्यांनी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. यावेळी मोकळ्या जागेत व शेडमध्ये बांधून ठेवलेले कत्तलीसाठी आणलेले एकूण १८ गोवंश जनावरे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांना ताब्यात घेत त्यांची सुटका केली. या (Slaughter of cattle) प्रकरणी नूरमिया शहाबुद्दीन कुरेशी (वय ६८, रा. मूर्तुजा कॉलनी, पाथरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान जिल्ह्यात गोवंश कत्तल आणि जनावरांच्या (Slaughter of cattle) अवैध वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने अलीकडील काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने होत असलेल्या धडक कारवायांमुळे अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाथरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कायद्याचे उल्लंघन करणार्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधातील पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.