Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > क्राईम जगत

वायर चोरी प्रकरण

50-60 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर चोरीचा मोठा प्रकार; दीड ते दोन लाखांचे नुकसान

Wire theft case: 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून लंपास


50-60 शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर चोरीचा मोठा प्रकार दीड ते दोन लाखांचे नुकसान

Wire theft case |

मलकापूर (Wire theft case) : तालुक्यातील भानगुरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रात्रीच्या सुमारास चोरीचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी भानगुरा गावातील विविध शेतांमध्ये प्रवेश करून विहिरी व ट्युबवेलवरील केबल वायर कापून नेल्या. या चोरीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

अनेक शेतकरी प्रभावित

या (Wire theft case) घटनेत प्रशांत बावस्कर, शांताराम चव्हाण, दिनेश बावस्कर, महेश बावस्कर, सुधाकर बावस्कर, बंडू वराडे, अतुल पाटील, दीपक पाटील, वासुदेव चव्हाण, रवींद्र टकले, कृष्णा बावस्कर, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश बोंडे, गजानन बोंडे, मुरलीधर नप्ते, ईश्वर पाटील, जयसिंग चव्हाण यांसह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण

सध्या तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पोलिसांचा धाक नसल्यामुळे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार; गस्त वाढविण्याची मागणी

या (Wire theft case) प्रकरणी भानगुरा येथील शेतकऱ्यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व शहर प्रमुख हरिदास गणबास यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

तातडीच्या उपाययोजनांची गरज

शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर या चोरीचा थेट परिणाम होत असून, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.