Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

शेतकरी गुन्हा माघार

'त्या' शेतकऱ्याचे बैल परत: गुन्हा माघार घेण्याची पोलीसांवर नामुष्की ओढवली!

Farmers crime retreat: जे आरजखेडा, ता. रेणापूर येथील शेतकरी भीमराव शामराव सूर्यवंशी हे दोन बैल बाजारातून खरेदी करून गावी जात असताना तू खाटकाकडे बैल विक्रीस जात आहेत म्हणून शेतकऱ्यावर अन्याय


त्या शेतकऱ्याचे बैल परत गुन्हा माघार घेण्याची पोलीसांवर नामुष्की ओढवली 

Farmers crime retreat |

लातूर (Farmers crime retreat) : मौजे आरजखेडा, ता. रेणापूर येथील शेतकरी भीमराव शामराव सूर्यवंशी हे दोन बैल बाजारातून खरेदी करून गावी जात असताना तू खाटकाकडे बैल विक्रीस जात आहेत म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करत लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तो मंगळवार रोजी दुपारी परत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पोलीसांची समाज माध्यमात प्रतिमा मलीन झाली आहे. 

 शेतकरी शेतीसाठी बैल चालवत नेत असताना त्याच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून बैल जप्त केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकांनी कडवटपणे प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे बैल परत करण्यात आले असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा माघार घेण्याची नामुष्की या पोलीसांच्या कृत्यावर ओढावली आहे. त्यामुळे समाज माध्यमात पोलीसांची प्रतीमा मलीन झाली आहे. 

काल मध्यरात्री पाटोदा, ता. लोहारा येथील बैलबाजारातून दोन बैल खरेदी (Farmers crime retreat) करून भीमराव सूर्यवंशी व त्यांचा मुलगा पायी चालत लातूरकडे येत असताना वरील दोघेजन हे बैल खाटकाकडे नेत आहेत. असे म्हणत तथाकथित गोरक्षाकातर्फे शेतकरी अडवला गेला त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांने पोलीस मदत केंद्रात संपर्क करत मदत मागीतले मात्र मदत करण्याऐवजी लातूर येथील विवेकानंद चौक पोलीसांनी त्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करत बैल गोशाळेत पाठवले होते.  लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यापर्यंत त्या शेतकऱ्यास बैलासह चालवीत नेऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए (१) ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा आपल्या नाकर्तेपणामुळे  दाखल करण्यात आल्याची समजूत झाल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांचे दोन्ही बैल परत केले व त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा माघार घेण्याची प्रक्रिया चालू आहे, असे वृत्त आहे.

शेतकरी भीमराव सूर्यवंशी (Farmers crime retreat) यांनी काल आपण बैल खरेदी केल्याचा दाखला दिला. आपले आधार कार्ड दिले, ओळख सांगितली. मी ४० एकर जमीन वहिती करतो हेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. मी माळकरी आहे, मी बैल खाटकांना कसे विकेन, खाटकाला विकले जाणारे बैल भाकड असतात. असे बैल पाटोदा, ता. लोहारा ते लातूर कसे चालतील असाही बचाव केला होता. मात्र पोलिसांनी व तथाकथित गोरक्षाकातर्फे शेतकऱ्यालाच चोर ठरवले आणि गुन्हा दाखल केला. मात्र समाज माध्यमात व अनेक समाज सेवकांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणी बारी पोलीसांवरच पलटली आणि दाखल गुन्हा माघारी घेण्याची नामुष्की विवेकानंद चौक पोलीसांवर ओढावली. या प्रकरणात समाजसेवक युट्यूबवर रविराज साबळे व अन्य लोकांनी भेटी दिल्याचे समजते.