Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

अवकाळी पाऊस व गारपीट

गव्हा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान

Unseasonal Rain: मानोरा तालुक्यातील गव्हा परिसरात २१ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकरी अशोक प्रभू राठोड यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.


गव्हा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान

Unseasonal Rain |

मानोरा (Unseasonal Rain) : तालुक्यातील मौजे गव्हा शिवारात दि. २१ मार्च रोजी सायंकाळच्या ३ वाजताच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी अशोक प्रभू राठोड यांच्या शेत सर्व्हे नंबर ६८ मधील शेतातील जमा केलेला हरभरा व शेतातील उभे पीक गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकरी कुटुंबाकडून केली जात आहे. 

सविस्तर असे की, शुक्रवारी ( दि. २१ मार्च ) रोजी सकाळपासून कडक ऊन तापत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला व कमी प्रमाणात (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गारा पडायला सुरुवात झाली. सुमारे २० मिनिटे बोरा एवढ्या गारपीट झाली. या गारांचा जमिनीवर अक्षरशः सडा पडल्या. या गारपिटीत शेतकरी अशोक राठोड यांच्या शेतातील दोन एकर जमिनीवरील जमा केलेला हरभरा व अडीच एकर शेतातील उभे गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीच्या मारामुळे गहू पीक आडवे पडले आहे. 

तालुक्यातील गव्हा, विठोली व चाकुर परिसरात शुक्रवारी अचानक अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट झाल्यामुळे काढणीला आलेले गहू, हरभरा आदीसह संत्रा, लिंबू, आंबा, कांदा व फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने प्रशासनाला नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांमधून होत आहे.

Related to this topic: