Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डिग्रस बैलगाडी मोर्चा

डिग्रस कर्‍हाळे तलाव प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण; बैलगाडी मोर्चा

Digras Bailgadi Morcha: डिग्रस (दाटेगाव) साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर पासुन आमरण उपोषण सुरू


डिग्रस कर्‍हाळे तलाव प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण बैलगाडी मोर्चा 

Digras Bailgadi Morcha |

हिंगोली (Digras Bailgadi Morcha) : डिग्रस (दाटेगाव) साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर पासुन आमरण उपोषण सुरू केले. उपोषणपुर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या बैलगाडी मोर्चाने अनेकांचे लक्ष वेधले होते. 

डिग्रस कर्‍हाळे तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करावा आणि सुरू असलेली भूसंपादन कारवाई थांबवावी या मागणीसाठी आजपासून हिंगोलीत तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. डिग्रस क. तलाव संघर्ष समितीच्या वतीने ११२ बाधित शेतकरी कुटुंबांनी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. डिग्रस कर्‍हाळे तलाव प्रकल्प रद्द करा, भूसंपादन कारवाई तत्काळ थांबवा, अशा प्रमुख मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत.

संघर्ष समितीचे म्हणणे आहे की, या (Digras Bailgadi Morcha) तलाव प्रकल्पामुळे ११२ शेतकरी कुटुंबांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी संपादित होणार असून शेतकरी भूमिहीन होणार आहेत. प्रशासनाने विश्वासात न घेता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. १ सप्टेंबर पासून सुरू झालेले हे आमरण उपोषण जोपर्यंत प्रकल्प रद्द करण्याचा लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.