Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सुकळी सिंचन तलाव प्रकल्प

सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पाडली बंद

Sukali Irrigation Tank Project: तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे प्रस्तावित सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन विभाग..


सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध मोजणी पाडली बंद

Sukali Irrigation Tank Project |

 

उपविभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव प्रकल्प रद्द करण्याची मागणी

सेनगाव (Sukali Irrigation Tank Project) : तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे प्रस्तावित सुकळी सिंचन तलाव प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घालत मोजणीचे काम तात्काळ बंद पाडले आहे ​प्रशासनाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच जमिनीचे संपादन केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

या (Sukali Irrigation Tank Project) प्रकल्पामुळे सुकळी बुद्रुकसह परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन पाण्याखाली जाण्याची भीती आहे. जमिनी गेल्यास शेतकऱ्यांवर थेट उपासमारीची वेळ येईल, असा इशारा देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

​यावेळी घटनास्थळी दाखल झालेले उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनाही शेतकऱ्यांनी घेराव घातला. हा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा आमच्यावर गोळ्या घाला, अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.