Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

राजेश हरिदास मेटांगे

आदिवासी समाजाला नवे नेतृत्व; राजेश हरिदास मेटांगे यांची गोंधळवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड

Rajesh Haridas Metange: आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे राजेश हरिदास मेटांगे यांची 'तंटामुक्ती समिती अध्यक्ष' म्हणून निवड गोंधळवाडी येथील गावात शांतता व एकजूटतेसाठी प्रेरक ठरली.


आदिवासी समाजाला नवे नेतृत्व राजेश हरिदास मेटांगे यांची गोंधळवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड

Rajesh Haridas Metange |

पातूर (Rajesh Haridas Metange) : ग्रामस्थांची एकजूट आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी गोंधळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत श्री. राजेश हरिदास मेटांगे यांची 'तंटामुक्ती समिती अध्यक्ष' म्हणून निवड करण्यात आली आहे. आदिवासी समाजातील एक अभ्यासू, शांत व कार्यतत्पर नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश मेटांगे (Rajesh Haridas Metange) यांच्या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गावपातळीवरील वाद-विवाद आपापसात मिटवून गावात शांतता, सुव्यवस्था व बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजेश मेटांगे (Rajesh Haridas Metange) यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजासह सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मेटांगे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व गावात कायम तंटामुक्ती आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गवाही दिली.