Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Farmer Suicide

सावकारांच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!

त्रासाला कंटाळून हंडरगुळी येथील रामदास शिवाजी बोळेगावे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.


सावकारांच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Suicide |

हंडरगुळीतील प्रकार; आरोपीला अटक करण्याच्या आश्वासनानंतर मृतदेह खाली उतरवला

वाढवणा बु. : घर बांधणीसाठी घेतलेले पैसे परत कर, असे म्हणत खाजगी सावकारांकडून सतत शिवीगाळ, धमकी आणि होणाऱ्या त्रासाला कंटाळून हंडरगुळी येथील रामदास शिवाजी बोळेगावे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेनंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ‘जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही,’ अशी संतप्त भूमिका नातेवाईकांनी घेतली. उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह खाली उतरवून हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

घर बांधकामासाठी घेतले होते व्याजी पैसे

याबाबत अधिक माहिती अशी की, हंडरगुळी येथील रामदास शिवाजी भोळे (वय ४५, व्यवसाय शेती व पिग्मी एजंट) यांनी घर बांधकामासाठी विक्रम उर्फ जंटू राजपाल माने व जीवन चंद्रकांत माने यांच्याकडून व्याजी पैसे घेतले होते. यातील काही रक्कम त्यांनी टप्प्याटप्प्याने खाजगी सावकारांना परत केली होती. मात्र, उर्वरित रकमेसाठी त्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर या त्रासाला कंटाळून रामदास बोळेगावे यांनी मोरतळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या आपल्या भावाच्या शेतात गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत मयताचा भाऊ विलास शिवाजी बोळेगावे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाढवणा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 264/26, कलम 108, 351(2), 351(3), 352, 3(5) भादंविनुसार विक्रम उर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने (तिघेही रा. हाळी, ता. उदगीर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.

१९ मे रोजीही आत्महत्येचा प्रयत्न?

दरम्यान, यापूर्वीही म्हणजेच १९ मे रोजी रामदास शिवाजी बोळेगावे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा हंडरगुळी ग्रामस्थांमध्ये होत आहे. विषारी औषध प्राशन करून त्यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती ग्रामस्थांमध्ये चर्चिली जात आहे.

डीवायएसपींनी दिले आरोपीला अटक करण्याचे आश्वासन

जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह खाली उतरू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर उदगीरचे डीवायएसपी अरविंद रायबोले घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

Related to this topic: